पतौडी कुटुंबियांची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता, सैफ अली खान आता नव्या वादाच्या भोवऱ्यात, काय आहे प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी चकू हल्ला झाला होता. त्यामुळे अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 5 दिवसांनंतर अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पण आता अभिनेता नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान याच्या कुटुंबाकडे भोपाळमध्ये 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे जी सरकारच्या ताब्यात येऊ शकते.शत्रू मालमत्ता कायद्यानुसार सैफ अली खान याची संपत्ती सरकारची होऊ शकते. सांगायचं झालं तर, भोपाळमधील ऐतिहासिक संस्थानांच्या संपत्तीवर 2015 पासून बंदी होती. उच्च न्यायालयाने पतौडी कुटुंबीयांना अपील प्राधिकरणात आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला होता. परंतु पतौडी कुटुंबाने दिलेल्या वेळेत आपली बाजू मांडली नाही. आता या आदेशाला खंडपीठात आव्हान देण्याचा पर्याय कुटुंबाकडे आहे. त्यामुळे सैफचं कुटुंब काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भोपाळ राज्यातील ऐतिहासिक संपत्तीवरील 2015 पासूनची स्थगिती आता रद्द करण्यात आली आहे. मध्य प्रदेश उच्च शत्रू मालमत्तेच्या प्रकरणात न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान, आई शर्मिला टागोर, बहिणी सोहा, सबा अली खान आणि सैफच्या अत्या सबीहा सुल्तान यांना स्वतःची बाजू मांजण्याचा निर्देश दिले होते. पण कुटुंबातील कोणताच सदस्य पुढे आला नाही. सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियांना न्यायालयाने दिलेली वेळ आता संपलेली आहे.
मुंबई
प्रकाशवार्ता ·
22-01-2025
·
12:36 PM